देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे जाणून घ्या शिक्षण !

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे जाणून घ्या शिक्षण !

Nirmala Sitharaman Education : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २०२४-२५ सालचा अर्थसंकल्प (Budget 2024-25) संसदेत सादर केला. पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थ मंत्रिपदाची धुरा स्वीकारली होती. त्यापूर्वी त्या केंद्रीय सरंक्षण मंत्री म्हणून कार्यरत होत्या. गेल्या काही वर्षात त्या मोदी सरकारमध्ये किचन कॅबिनेटमधील महत्त्वाच्या सदस्य राहिल्या आहेत.

मागील सरकारमध्ये निर्मला सीताराम यांनी सप्टेंबर २०१७ ते मे २०१९ पर्यंत सरंक्षण मंत्री म्हणून काम केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांची अर्थमंत्रीपदी वर्णी लागली. इंदिरा गांधी यांच्यानंतर सरंक्षण मंत्रीपद भुषविणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या.

निर्मला सीतारामण यांचे बालपण आणि कुटुंब- निर्मला सीतारामण यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५९ साली तामिळनाडू राज्यातील मदुराई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नारायण सीतारामण तर आईचे नाव सावित्रीदेवी होती. वडील रेल्वे विभागात नोकरीला असल्याने घरची परिस्थिती चांगली होती. लहानपणापासून त्यांना अभ्यासाची आवड होती. तसेच देशाच्या राजकारणाचेही आकर्षण होते. वडिलांच्या कामामुळे त्यांचे बालपण देशातील वेगवेगळ्या ठिकाणी गेले.

निर्मला सीतारामण यांचे शिक्षण- अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी तिरुचिरापल्ली येथील सीतालक्ष्मी रामास्वामी कॉलेजमधून अर्थशास्त्रामध्ये पदवी घेतली. त्यांनंतर पुढील शिक्षणासाठी त्या दिल्लीत गेल्या. तेथे त्यांनी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातून अर्थशास्त्र विषय घेऊन पदव्यूतत्तर पदवी (master degree) घेतली. त्यानंतर त्यांनी पीएचडीसाठी प्रवेश घेतला होता. पण त्यावेळी त्यांना त्यांच्या पतीसोबत लंडनला जावे लागल्याने त्या पीएचडी पूर्ण करू शकल्या नाहीत.

निर्मला सीतारामण यांचा राजकारणात प्रवेश-राजकारणात प्रवेश करताना नि राजकारणात प्रवेश र्मला सीतारामण यांनी विविध स्तरावर काम केले. सुरुवातीला २००३ ते २००५ याकाळात राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर २००६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करुन राजकारणाची सुरुवात केली. तर दुसरीकडे त्यांनी पती डॉ. परकला प्रभाकर हे प्रजा राज्यम पार्टीचे काम करत होते.

निर्मला सीतारामण उत्तम प्रवक्त्या – सुरुवा तीला सीतारामण यांनी आंध्रप्रदेशमध्ये भाजपच्या प्रवक्त्या म्हणून काम केले. ज्यावेळी नितीन गडकरी पक्षाचे अध्यक्ष झाले होते त्यावेळी त्यांची पक्षाच्या मुख्य सहा प्रवक्त्यांमध्ये वर्णी लागली होती. विविध चर्चासत्रामध्ये सीतारामण पक्षाची बाजू मांडत असते. अनेकदा त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांमुळे भाजपच्या विरोधी पक्षांना चांगला फटका बसला होता. २०१४ साली ज्यावेळी भाजपचे सरकार आले त्यावेळी त्यांनी पक्षाची बाजू उत्तमपणे मांडली होती ज्याचा फायदा पक्षाला झाला होता.

भारतीय जनता पक्षाचे १०१४ साली सरकार आल्यानंतर आंध्रप्रदेशमधून त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले आणि मंत्रिपदही दिले. त्यानंतर त्यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा पदभार देण्यात आला होता. त्यानंतर २०१७ साली सीतारामण यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्या सरंक्षण मंत्री झाल्या होत्या. २०१९ पासून आजतागायत त्या देशाच्या अर्थमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

Leave a Comment