Karhad Palika Bharti 2022

कऱ्हाड पालिकेतील लिपिक, शिपाई, मजूर यांसारख्या २०० पदांची भरती कधी ?

Karhad Palika Bharti 2022 – Insufficient number of staff for cleaning. Staff recruitment is expected according to the criteria of road length, population etc. Although the government has set a standard of four health workers for every one thousand people, there is not much recruitment here. The population of Karhad is around one lakh. Therefore, Karhad is expected to have at least 400 employees. However, there are not many employees in the corporation. 200 posts like Clerk, Peon, Mukadam, Cleaning Peon, Laborer are required. Therefore, the corporation should give the authority to recruit 20% of the 200 vacancies. Know More details about Karhad Palika Bharti 2022 , Karhad Palika Recruitment 2022, Karhad Palika Vacancy 2022 at below

स्वच्छ अभियानात देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या येथील पालिकेत तब्बल २०० कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे मोठी कठीण स्थिती आहे. अनेक विभागांत कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने सामान्यांची कामे रखडत आहेत.

महत्त्‍वाच्या बांधकामसहित आस्थापना, आरोग्य विभागातही कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने अनेक कामे अर्धवट आहेत. कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रिक्त जागांच्या २० टक्के कर्मचाऱ्यांच्या भरतीची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव पालिकेने शासनाला दिला आहे. रिक्तपदांकडे दुर्लक्ष करणारे शासन पालिकेच्या २० टक्के भरतीच्या प्रस्तावावर काय निर्णय देणार, याची उत्सुकता लागून आहे.

कऱ्हाड पालिकेत ३२५ कर्मचारी आहेत. शासनाने आकृतीबंद लागू केल्यानंतर पालिकेचे २०० कर्मचारी निष्काषित झाले. त्यानंतर ३२५ कर्मचारी उरले आहेत. निष्काषित झालेल्यांना जादा भरती समजून थांबविले. त्यामुळे त्या जागा रिक्त गणल्या जातात. तेवढ्या पदांसह सध्या पालिकेत निवृत्तीनंतर होणाऱ्या रिक्तपदांमुळे कर्मचाऱ्यांची वानवा आहे. शासनाकडून भरती बंद असल्याने पालिकेला कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करून त्यांच्यावर कामांची मदार ठेवावी लागते आहे. त्या भरतीत स्थानिक राजकारणाचा होणारा हस्तक्षेप पालिकेसाठी डोकेदुखी ठरतो आहे. त्यामुळे मूळ भरती करण्याची पालिकेची कित्येक वर्षांची मागणी दुर्लक्षित आहे. बांधकाम, आरोग्य, आस्थापनासह कर विभागातही कर्मचाऱ्यांची वानवा आहे. लिपिक, शिपाई, मुकादम, स्वच्छता शिपाई, मजूर यांसारख्या २०० पदांची गरज आहे. सातत्य ठेवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पालिकेने रिक्त २०० जागांच्या २० टक्के कर्मचारी भरतीचे अधिकार पालिकेला द्यावेत, असा प्रस्ताव शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठवला आहे. त्यानुसार भरती झाल्यास किमान ४० कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्याला शासन मान्यता देणार काय, याची उत्सुकता लागून आहे.

…याही भरतीत निकष नाहीच

स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरीच आहे. भरतीच्या निकषानुसार रस्त्याची लांबी, लोकसंख्या आदी निकषांनुसार कर्मचारी भरती अपेक्षित आहे. शासनाने एक हजार माणसांमागे चार आरोग्य कर्मचारी असे गृहित धरण्याचा निकष ठेवला असतानाही तितकी भरती येथे दिसत नाही. कऱ्हाडची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे त्या हिशोबाने कऱ्हाडला किमान ४०० कर्मचारी अपेक्षित आहेत. मात्र, पालिकेत तितके कर्मचारी नाहीत. म्हणजेच निम्मे कर्मचारी स्वच्छतेचा भार पेलत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कामाचा ताण वाढतो आहे.

Leave a Comment